मागल्या
भागाकडून पुढे
चालू
जेव्हा
परमेश्र्वर
(स्वयंभु)
जागा
होतो तेव्हा
जगसुद्धा
जागृत होते
व जेव्हा
तो झोपतो
तेव्हा तेसुद्धा
झोपते.
५२
जेव्हा
परमेश्र्वर
झोपतो तेव्हा
सर्व सचेतन
सृष्टी व
त्यांची
मनंसुद्धा
आपली कामं
थांबवून स्तब्ध
होत असतात.
५३
जेव्हा
सृष्टी
स्वयंभुमध्ये
विलीन होते
तेव्हा स्वयंभु
जो ह्या
सृष्टीचा
कर्ता आहे
तो समाधीमध्ये
शिरतो.
५४
जेव्हा
तो आत्मा अज्ञानरुपी अंधारात
शिरतो तेव्हा तो इंद्रीयांत
रमतो व आपले मुळ स्वरुप व कार्य
विसरतो,
पुन्हा
इंद्रीये सोडतो,
असे
होत रहाते.
५५
तो
सुक्ष्म स्वरुपात झाडांच्या
बियांत शिरतो,
आणि
पुन्हा नवीन वनस्पतीत रहातो.
५६
अशारितीने,
तो
नश्र्वर,
आलटून
पालटून जागृती व निद्रा अशा
अवस्थात जात चल व अचल सृष्टी
उत्पन्न करतो व मारतो.
५७
स्वयंभुने
जग चालवणारे पवित्र नियम तयार
केले व प्रथम भृगुला शिकवले,
त्यानंतर
ते नियम भृगुने मरीकी व इतर
ऋषीना शिकवले.
५८
भृगु
प्रसन्न होऊन मनुच्या विनंतीचा
मान राखून सृष्टीचे नियम
शिकवण्यास तयार झाला.
५९
मी
भृगु,
आता
हे पवित्र नियम सर्व ऋषीना
पूर्णतया सांगणार आहे,
ऋषीमुनीनी
हे संपूर्ण नियम माझ्याकडून
शिकून घ्यावेत.
६०
सहा
अति श्रेष्ठ बुद्धि असलेले
मनु,
जे
स्वयंभु परमेश्र्वराने
त्याच्या विचाराने उत्पन्न
केले व ज्यांनी नंतर ही सृष्टी
उत्पन्न केली,
त्यांची
नांवे अशी आहेत.
६१
स्वरोकिष,
औत्तमी,
तमसा,
रैवत,
कक्षुष
आणि मनु असून ते अति तेजस्वी
होते.
जे
विस्वताचे पुत्र होते.
६२
ते
सात मनु,
विवस्वत
धरून,
ज्यानी
त्यांच्या सामर्थ्याने सर्व
सजीव व निर्जीव सृष्टी उत्पन्न
केली व जे त्यांना आखून दिलाली
कामे दिलेल्या कालखंडात करीत
रहातील.
६३
काळ
मोजण्यासाठी,
अठरा
निमिषाचा एक कशस्थ,
तीस
कशस्थाचा एक काळ,
तीस
काळाचा एक मुहुर्त,
अशा
अनेक मुहुर्तांचा दिवस व रात्र
असे ठरले.
६४
सुर्य
दिनाचे दिवस व रात्र असे दोन
भाग करतो,
६५
जगाचा
एक महीना पितरांचा एक दिवस
असतो,
कृष्ण
पक्षाचे पंधरा दिवस रात्र
असते व शुक्ल पक्षाचा पंधरा
दिवस पितरांचा दिवस असतो.
६६
मनुस्मृती
प्रमाणे अनेक मनु उत्पन्न
झाले आहेत व त्यांच्या
व्यवस्थापनाने हे जग चालते
असे दिले आहे.
पुढील
पोस्ट मध्ये चालू
माझा
इमेल
ashokkothare@gmail.com
ह्या
इमेल
वर
तुम्ही
संपर्क
करु
शकता.