हत्या
म्हणजे ठार मारणे.
हिंसा
म्हणजे दु:ख,
वेदना
देणे.
म्हणजे
हत्या व हिंसा ह्या दाेन
संज्ञांत बराच भेद आहे.
भगवत्गीतेत
श्रीकृष्णाने अर्जुनास
काैरवांची हत्या करावयास
सांगितले अाहे परंतु,
तिच्यात
हिंसेचा साधा उल्लेखसुद्धा
आढळून येत नाही.
त्यामुळे
गीतेत हिंसेबाबत श्रीकृष्णाने
काहीही सांगितलेले नाही हे
विशेष.
त्याउलट
जैन मान्यतेनुसार हिंसा वर्ज
सांगितली आहे परंतु,
तेथे
हत्या वर्ज असे सांगितलेले
नाही.
अशा
परिस्थितीत ह्या दाेन गाेष्टीत
समन्वय कसा साधावयाचा हा
प्रश्र्न उत्पन्न हाेताे.
हिंसा
करणे म्हणजे दु:ख,
वेदना
देणे.
ठार
मारतांना वेदना हाेतेंच असे
नाही.
उदाहरणार्थ,
शस्त्रक्रिया
करतांना बेहाेष केले जाते,
त्यावेळी
त्या माणसाला वेदना हाेत
नाहीत.
वेदना
हाेण्यासाठी आपली संवेदना
क्षमता कार्यरत असावी लागते.
जर
ती कार्यरत नसेल तर वेदना हाेत
नाहीत.
हे
झाले शारिरीक वेदनांबद्दल.
माणसाला
व
इतर प्राण्यांना केवळ
शारिरीक वेदना हाेत नाहीत तर
मानसिक वेदनासुद्धा माेठ्याप्रमाणात
हाेत असतात.
माणसाला
मानसिक वेदना तेव्हां हाेतात
जेव्हां काेणी त्याचा अपमान
करते.
अशा
वेदनेलासुद्धा हिंसा समजले
जाते.
अशा
हिंसेमुळे हत्या हाेत नसते.
तरीसुद्धा
अशी क्रिया दु:ख
उत्पन्न करणारी असते.
म्हणून
ती हिंसा समजली जाते.
हिंसेचे
दाेन प्रकार असतात.
एका
हिंसेला निष्पाप हिंसा असे
समजले जाते व दुसर्या हिंसेला
पापकारक हिंसा समजले जाते.
बर्याच
वेळी आपण अजाणता काेणाला मनाने
दुखवत असताे अशा वेळी त्या
माणसाला दु:ख
झाल्यामुळे ती हिंसा ठरते.
अशा
मुद्दाम न केलेल्या हिंसेला
निष्पाप हिंसा समजले जाते.
परंतु,
जर
जाणुनबुजून अपमान केला असेल
तर ती पापकारक हिंसा समजली
जाते.
हिंदू
व जैन मान्यते प्रमाणे हत्या
पापकारक मानली जात नाही;
हे
विशेष आहे.
गीतेत
भगवान कृष्णाने अर्जुनास
काैरवांची हत्या करण्यास
सांगितले व अशी हत्या किती
हितकारक अाहे त्याबद्दल निवेदन
गीतेत आढळते.
म्हणजे
हत्या जर आवश्यक असेल तर त्याला
विराेध करण्याचे कारण नाही.
उलट
काही हत्या उपयुक्त ठरू शकते.
वाईटाचा
नाश करण्यासाठी व जगण्यासाठी
हत्या करण्याची परवानगी असते.
म्हणजे
खाण्यासाठी प्राणी मारणे
मंजूर अाहे.
जर
त्यामुळे वेदना हाेत नसेल तर
अशी हत्या कशीही केली व काेणत्याही
कारणासाठी केली तरी ती पापकारक
ठरत नाही हे विशेष.
आता,
मनुस्मृतीचा
तिसरा भाग श्र्लाेक ५१ – ७१
वाचू या.
जाे
बाप जाणकार आहे ताे आपल्या
मुलीचा गैरफायदा (लैंगिक)
कधीही
घेणार नाही.
परंतु,
जाे
माेहात पडून आपल्या मुलीचा
गैरफायदा घेताे ताे मुलीला
विकल्याचे पातक करीत असताे.
५१
जे
पुरुष त्यावर अवलंबून असणार्या
स्त्रीच्या संपत्तिचा अपहार
करील ताे पापी पुरुष नरकात
जाईल.
५२
काही
समजतात किं,
अर्श
लग्नविधीत घेतले जाणारे,
हक्काचे
आहे तर ते सरासर चुकीचे आहेत
कारण,
असे
समजणे म्हणजे,
स्वताची
मुलगी विकण्यासारखे पाप हाेते.
५३
जेव्हां
नातेवाईक अर्श विधीत दिलेले
न वापरतां त्या स्त्रीसाठी
जपून ठेवतात,
जे
याेग्य आहे,
कारण,
ते
धन त्या स्त्रीचे स्त्रीधन
समजावयाचे असते.
५४
टीप:
आपण
त्या स्त्रीस पाेसताे आहाेत
तेव्हां त्या धनावर आपला हक्क
आहे असे समजणे महापाप अाहे.
स्त्रीचा
नेहमी तिच्या वडिल,
भाऊ,
पति,
दीर,
मुलगा
अशा सर्व नजिकच्या पुरुषांनी
सन्मान करावयाचा असताे.
असे
केल्यांने त्या सर्व पुरुषांचे
कल्याण हाेत असते.
५५
जेथे
स्त्रीवर्गाचा सन्मान हाेताे
तेथे देव प्रसन्न हाेतात.
जेथे
स्त्रीवर्गाचा अवमान हाेताे
तेथे काेठलेही शुभ कार्य
यशस्वी हाेत नाही.
५६
ज्या
परिवारातील सज्जन स्त्रीयां
दु:खी
कष्टी (अपमानामुळे)
असतात
त्या परिवाराचा नाश हाेताे.
जेथे
त्या आनंदात असतात ताे परिवार
नेहमी सुखी रहाताे.
५७
ज्या
घरात स्त्री नातेवाईकाचा
अवमान हाेताे ते घर शापीत
झाल्यासारखे विलक्षण रित्या
नष्ट हाेते.
५८
टीप:
कारण,
अशा
घरावर पितरांचा काेप हाेताे.
जे
पुरुष स्वताचे हित इच्छितात
त्या पुरुषांनी सुटीच्या
दिवशी कुटूंबातील स्त्रीसाठी
भेट वस्तु म्हणून कापड,
दागिने
व चविष्ट खाद्यपदार्थ तिला
द्यावेत.
५९
ज्या
घरातील पति व पत्नी एकमेकांबराेबर
संतुष्ट हाेऊन रहातात ते घर
आनंदमय हाेते.
६०
जर
पत्नी साैदर्यवान नसेल तर ती
आपल्या पतिस आकर्षित करू शकत
नाही,
अशा
घरात पाळणा हलत नाही.
६१
ज्या
घरातील गृहीणी सुंदर नसते ते
घर निस्तेज असते,
परंतु,
जर
ती सुंदर असेल तर ते घर तेजाळून
निघते.
६२
वेदांचा
अभ्यास न केल्यामुळे,
हलक्या
कुळात लग्न केल्यामुळे,
पवित्र
विधींकडे दुर्लक्ष केल्यामुळे
व ब्राह्मणांकडे तुच्छतेने
पहाण्यामुळे माेठी घराणीसुद्धा
बरबाद हाेतात.
६३
हस्तकला,
सावकारी,
शुद्र
स्त्रीपासून मुले झाल्यामुळे,
अथवा
तिला सांभाळल्यामुळे,
गाई,
घाेडे,
वाहने
ह्यांचा व्यापार केल्यामुळे
तसेंच शेती केल्यामुळे ब्राह्मण
र्हास पावताे.
६४
टीप:
असा
ब्राह्मण वैश्य अथवा शुद्र
ठरताे,
म्हणजे
ब्राह्मणांने ही कामे करावयाची
नसतात.
अपात्र
लाेकांना दान केल्याने,
याेग्य
माेबदला न देण्यामुळे,
वेदांचा
अभ्यास नीटपणे न करण्यामुळे
ब्राह्मणाचा र्हास हाेताे.
६५
संपत्ति
कमी असली तरी वेदांचा अभ्यास
व्यवस्थितपणे करणारी कुटूंबे
नावारुपाला येतात.
६६
लग्नाच्या
वेळी पेटविलेला अग्नी वापरून
ते कुटूंब पांच महत्वाचे यज्ञ
करतील आणि त्याच्या मदतीने
ते दरराेजचे जेवण शिजवतील.
६७
घरात
जणूकाय पांच खाटिकखाने आहेत
असे म्हणावेसे वाटते कारण,
त्यात
शेगडी,
पाटा-वरवंटा,
झाडू,
खलबत्ता,
भांडे
ह्यांच्या मदतीने ते घर आपली
नित्याची कामे करीत असते.
६८
टीप:
ह्यांवस्तुंमुळे
हिंसा हाेत असते असा संकेत
मनुस्मृती देत आहे.
म्हणून
त्यां पांच गाेष्टींना खाटिकखाने
असे म्हंटले आहे.
शेगडीत
शिजवतांना भाज्या ज्या सजीव
असतात त्या मरतात म्हणून शेगडी
खाटिकखाना,
पाटा-वरवंटा
व खलबत्ता ह्यांत वानस्पतिक
खात्यपदार्थ रगडले जाऊन
त्यातील सजीवता नष्ट हाेत
असते म्हणून खाटिकखाना,
झाडूने
केरकचरा काढतांना सभाेवारचे
जीव मारले जातात म्हणून ताे
खाटिकखाना,
भांड्यात
पदार्थ शिजतात त्यामुळे तेथे
शिजण्याच्या क्रियेत जीव
मारले जातात म्हणून ते खाटिकखाना
असे हे पांच खाटिकखाने ठरवले
आहेत.
ह्या
पांच पापकारक वस्तुंमुळे जे
पाप दरराेज संसारी माणूस करीत
असताे त्याचे निराकरण करण्यासाठी
पांच दान विधी सांगितल्या
आहेत,
त्या,
गृहस्थाने
करावयाच्या असतात.
६९
टीप:
ह्या
पांच साधनांचा वापर करण्याने
सुक्ष्म जीव,
वनस्पतितील
जीव मारला जात असताे म्हणून
त्या वस्तुंना खाटिकखाने
संबाेधले आहे.
ती
पांच दाने अशी,
१)
विद्यार्थ्याला
विनामुल्य शिकवणे,
२)
पितरांसाठी
तर्पण करणे,
३)
हाेमात
हवन करणे,
४)
भूतांसाठी
(मृत
पुर्वज)
बळी
(मांसाचा
प्रसाद)
देणे,
आणि
पाहुण्यांना अादरपूर्वक
वागवणे ही सांगितली आहेत.
७०
जाे
यजमान ही सर्व दाने यथासांग
पार पाडत असताे ताे ह्या
पापांपासून मुक्त रहाताे.
तरीसुद्धा
ताे ती पापे दरराेज करीतच
राहताे कारण,
त्याला
संसार करावयाचा असताे;
म्हणून
ही दाने सदैव करीत रहावी लागतात.
७१
पुढील
पाेस्ट पासून मनुस्मृतीचा
अभ्यास व इतर गप्पा अशाच चालू
रहातील.
संपर्क
ईमेल – ashokkothare@gmail.com
आपली
मते
मला
ह्या
ई-मेलवर
पाठवून
हा
ब्लॉग
अधिक
चांगला
करण्यास
मदत
करावी.