सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

हिंदू कोण – ३९

मागील भागातून पुढे
. सत्य, असत्य व हित, अहित ह्याचा पाप-पुण्य संबंधातील विचार –
ह्या उदाहरणात दोन हित उद्देश दिसतात. एक त्या स्त्रीचे हित व दुसरे त्या दोन धटिंगणांचे हित. धटिंगणांचा उद्देश स्पष्टपणे आसुरीसंपदेचा आहे हे उघड दिसते त्यामुळे त्या हितात असत्य (परमेश्र्वर नाही) आहे म्हणून ते सत्याचे (परमेश्र्वराशी) अहित ठरते म्हणून त्यज्य ठरते. त्या स्त्रीचा उद्देश स्पष्टपणे दैवीसंपदेशी निगडीत आहे म्हणून तिचे हित सत्याचे (परमेश्र्वराशी) ठरते व म्हणून योग्य ठरते.
ह्या उदाहरणात दोन पापकृत्ये पर्यायी असल्याचे दिसते, एक पर्याय त्या स्त्रीच्या हिता विरुद्ध वागल्याने होणारे जास्त वाईट पाप व दुसरे त्या धटिंगणांना खोटी माहिती देऊन होणारे कमी वाईट पाप. ह्या दोन पापकृत्यात कोणते जास्त वाईट ते पहावे लागेल. जेव्हां दोन पापांतून निवड करण्याची वेळ येते तेव्हां कमी वाईट पाप करावे व जास्त वाईट पाप टाळावयाचे असते.

अशारितीने सत्य-असत्य, हित-अहित, पाप व पुण्य ह्यांचे परस्पर संबंध कसे असतात हे लक्षात येते. जो हिंदू हे ओळखून ह्याची निवड करून आपली वर्तणूक ठरवतो तो नेहमी पुण्यवान राहिल असे समजले जाते. आपल्या दैनंदिन जीवनात हे ठरवण्याचे अनेक प्रसंग उद्भवत असतात. त्याकरता ह्याची चर्चा येथे केली आहे.
५८. शेवटी वास्तविक सत्य व अध्यात्मातील सत्य ह्यातील फरक समजून घ्यावा लागेल. वरील उदाहरणांत आपण अध्यात्मातील सत्य काय ते पाहिले आहे. जीवनात वास्तविक सत्यापेक्षा अध्यात्मातील सत्य जास्त महत्वाचे आहे असे हिंदू विचार सांगतो. असे असले तरी, वास्तविक सत्याचे काय महत्व जीवनात आहे ते सुद्धा पहावे लागेल. न्यायालयात साक्ष देतांना काय बोलावे असा प्रश्र्न उपस्थित होतो. कांहीं सांगतील तेथेसुद्धा अध्यात्मातील सत्यच सांगावे परंतु, न्यायालय मात्र तेथे वास्तविक सत्याची अपेक्षा करीत असते. कारण, तेथे हित कोणाचे पहावयाचे, पाप कोणाला लागणार, अध्यात्मातील सत्य व वास्तविक सत्य ह्यांतील तडजोड कशी करावयाची हे सर्व ठरविणे निरनिराळ्या परिस्थितीवर अवलंबून असते. आपली न्याय व्यवस्था वास्तविक सत्यावर निर्धारीत असावी कीं, अध्यात्मातील सत्यावर असावी हे धोरण शासनाला ठरवावे लागेल. सांप्रत जी न्याय व्यवस्था आपल्याकडे अमलात आहे ती पापपुण्यावर आधारीत नाही, ती कायद्यांवर आधारीत आहे. कायद्यातील योग्य व अयोग्य ह्यांचा संबंध पापपुण्याशी नसतो. म्हणून जे कायदेशीर आहे ते पुण्यकारक असेलच असें नाही व जे बेकायदेशीर आहे ते पापकारक असेलच असे नाही. असें असल्यामुळे, व्यावहारीक जगात आणखीन एक सत्य ढवळाढवळ करतांना आढळते, त्याला आर्थिक सत्य म्हणूया. पैसे देऊन सत्य बदलण्याचे प्रकार सदोदित होत असतात ते एक विशेष सत्य न्यायालयात आढळते. त्यामुळे हा मुद्दा विवाद्य असून त्यावर चर्चा करणे ह्या लिखाणाच्या आवाक्या बाहेरचे आहे म्हणून, ह्या ठिकाणी मला तरी जास्त लिहीण्याची आवश्यकता वाटत नाही. बर्याच प्रसंगी न्यायालयातील सत्य अध्यात्मिक दृष्ट्या असत्य असले तरी ते माणसाला स्वीकारावे लागते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे, सत्य व असत्य ह्यांचा संबंध समाजातील भ्रष्टाचाराशी असल्याचे दिसते. बर्याच निवाड्यात न्यायलयाने वास्तविक सत्य ग्राह्य धरल्यामुळे अध्यात्मिक अन्याय होतो असें दिसते.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – ३१ -
तांबे, सोने, चांदी ह्यांचा उपयोग चलनात नेहमी होत असतो, त्यासाठी त्यांची परिमाणे आता सांगतो. १३१
जाळीच्या पडद्यातून सूर्यकिरण येतात त्यांचे सुक्ष्म बिंदू हवेच्या कणांवर परावर्तित होतांना दिसतात ते सर्वात लहान असतात असें समजून ते सर्वात सुक्ष्म मुल्य समजावे. त्याला त्रसारेणू (धुळीकण) असें समजावे. १३२
आठ त्रसारेणू हे एक लिखा (ऊचे अंडे) एवढे समजावे, अशा तीन लिखा बरोबर एक बीज (काळ्या मोहरीचे बी) रगसर्शप असें समजावे, तीन रगसर्शपांचा एक पांढर्या मोहरीचे बी समजावे. १३३
सहा पांढर्या मोहरीच्या बी बरोबर जवाचे बी असें समजावे, तीन जवाच्या बी बरोबर एक गुजा (क्रिशला) समजावे. पांच गुंजा बरोबर मांसा (वटाण्याचे बी) समजावे. अशा सोळा मांसांचे एक सुवर्ण्य मुल्य धरावे. १३४
चार सुवर्णांचा एक पल, दहा पलांचा एक धर्न, दोन क्रिशलांचे (चांदीच्या) एक मशक (चांदीच्या) असें समजावे. १३५
सोळा माशकाचे धर्न किंवा पुरन समजावे. आणि एक गोष्ट लक्षात असू द्यावी कीं, एक कर्श तांब्याचा असेल तर त्याला कर्शपना किंवा पना समजावे. १३६
दहा धर्नांचा (चांदीच्या) एक सत्मण बनतो, चार सुवर्णांचा एक निष्क असतो हे ध्यानात ठेवावे. १३७
दोनशे पन्नास पनांचे पहिले सर्वात लहान माप अमर्समण असते. त्याचे पांचशे म्हणजे मधील अमर्समण व एक हजार असल्यास वरील अमर्समण समजावे. १३८
कर्जफेड न केल्याची कबुली दिल्यास त्याला पांचशे मुद्रा दंड करावा पण नाकारल्यास आणि ते सिद्ध झाले तर दुप्पट दंड करावा. १३९
सावकार आपल्या कर्जाचे व्याज स्वतः ठरवू शकतो. त्याच्या मुद्दलाच्या ते (कमाल), महिना अठरावा भाग शंभर भागांचा, (अठरा टक्के) असें वशिष्ठाने सुचविले आहे. १४०
परंतु, मनु सांगतो किं, चांगल्या माणसांसाठी तो व्याजाचा दर महिना दोन टक्का असावा. असा धेतल्याने तो (सावकार) पापी ठरत नाही. १४१
वर्णानुसार तो व्याजाचा दर दोन, तीन, चार आणि पांच असा असावा. १४२ टीपः ब्राह्मणांस दोन व शुद्रास पांच असे सुचवले आहे.
गहाण पत्र चांगले असेल तर तो सावकार बिनव्याज कर्ज देऊ शकतो व कालांतराने तो गहाण विकून कर्ज वसूल करू शकतो. १४३
सावकाराने ठेवलेली वस्तु वापराता कामा नये, जर त्यांने ती वापरली तर त्याची चोरी त्यांने केली असा अर्थ लावला जाईल. किंवा त्या वस्तुची रास्त किंमत सावकाराला ऋणकोस द्यावी लागते. त्याशिवाय कर्ज माफ होईल. १४४
काळ कितीही गेला तरी गहाणवट अथवा रक्कम संपली असें धरता येत नाही. त्याची वसुली सावकाराकडून करता येईल. १४५
मित्रत्वाच्या नात्याने जर ती गहाणवट (गाय, उंट, घोचा, इतर पशु) वापरली गेली तर ती मालकाला परत करावी लागेल. १४६
परंतु, जर असा वापर होत असतांना मालकांने त्यास आक्षेप गेतला नाही तर त्या (गहाण) मालकांस परत मांगता येणार नाही. १४७ टीपः मालकांने (ऋणकोने) आक्षेप घेऊन त्याचा हक्क दाखवायचा असतो.
जर मालक (ऋणको) मूर्ख (वयाने लहान) अथवा वेडा नसेल तर वरील नियम लागू होतो. मालक मूर्ख असेल तर वरील नियम लागू होत नाही. वापरणार्याला त्या चीजा परत कराव्या लागतील. १४८
गहाणपत्र, सीमा, लहान मुलाची मालमत्ता, व्याजू लावलेली रक्कम, बंद लखोटा, बाई, राजाची मालमत्ता आणि श्रोत्रीय ह्यांची मालमत्ता इतराने कितीही वापरली तरी त्याची मालकी त्यांना होत नाही. १४९
जर सावकाराने मूर्खपणाने ऋणकोची चीजवस्तु त्याच्या परवानगा शिवाय वापरली तर त्याने आक्षेप घेतल्यास त्याला (ऋणकोला) भरपाई म्हणून अर्धे व्याज माफ करावे लागेल. १५० टीपः सावकाराकडे ठेवलेली गहाणवट सुरक्षित आहे कीं नाही ते तपासण्याचा अधिकार ऋणकोला असतो.
क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा