सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

हिंदू कोण – ४०

मागील भागातून पुढे –
. हिंदूंचे आहार, विहार व विचार ह्याबद्दलचे मार्गदर्शन –
५९. प्रथम आपण हिंदूंच्या आहारा बाबत काय मार्गदर्शन आहे ते पहाणार आहोत. निसर्गाच्या रचनेवरून मनुष्य प्राणी उभय आहारी आहे असे दिसते. हे कसे ठरते ते पहावे लागेल. प्राण्याचा आहार त्याची दातांची रचना व पचनसंस्था कशी काम करते ह्यावर विसंबून असतो. माणसाच्या दातांची रचना त्यातील सुळे व दाढा पहाता, तसेंच त्याची पचन संस्था ज्या प्रकारे काम करते ते पहाता तो मांस व शाक असें दोनही खाणारा प्राणी आहे असें समजते. माणसाच्या आतड्यात जी जीवाणू संपदा (फ्लौरा फौना) असते तीसुद्धा विचारात घ्यावी लागते. माणसाचा शाकाहार व जनावरांचा शाकाहार ह्यांत एक फरक असतो, माणसाला बराचसा शाकाहारसुद्धा शिजवूनच करावा लागतो म्हणून तो पच्य शाकाहार ठरतो. न शिजवलेला कच्चा शाकाहार कमी असतो. इतर प्राणी कच्चा शाकाहार करीत असतात. ह्याचे कारण असें सांगतात किं, माणसाच्या आतड्यातील जीवाणू संपदा शाकाहारी प्राण्याच्या जीवाणू संपदेपेक्षा वेगळी असते. हिंदूनी निसर्गाच्या ह्या आदेशाचे पालन करावयाचे असते, म्हणजे उभय आहार केला पाहिजे. केवळ शाकाहार करणे म्हणजे निसर्गाचे आदेश मोडण्यासारखे, म्हणजे पाप ठरते. आज अज्ञानी माणूस भावनाविवशतेंने काल्पनिक तत्त्वज्ञानाच्या आहारी जाऊन हा निसर्गाचा उभय आहारी राहाण्याचा आदेश मोडीत काढतांना दिसतो. निसर्गाचे नियम न पाळणे हे पाप असें समजले तर निव्वळ शाकाहार करणे हेसुद्धा पापकर्म ठरते. आपण पृथ्वीच्या समशितोष्ण कटीबंधात असल्यामुळे आयुर्वेदा प्रमाणे आहार उभय रहाण्यासाठी पच्य शाकाहाराचा भाग ७० ते ८० टक्के ठेवावा व उरलेला मांसाहार असावा असें आहे. असे धोरण आहाराबाबत ठेवले तर माणसाची प्रकृती उत्तम रहाते असें समजले जाते. परंतु, शीत कटीबंधातील लोकांनी आहार ५० टक्के प्रती ठेवावा. आपल्या पचन क्रियेत आतड्यातील जैविक संपदा ज्याला इंग्रजीत फ्लौरा फौना म्हणतात, त्याचे संवर्धन होण्यासाठी आयुर्वेदात पंचामृताचा किंवा पंचारिष्टाचा उपयोग करण्याची शिफारस आहे. म्हणून खर्या हिंदूंनी दिवसातून एकदा तरी पंचामृताचे चाटण करावे. किंवा पंचारिष्टाची एक मात्रा आठवड्यातून दोनदा घ्यावी. त्यामुळे आतड्यातील जैविक संपदा संमृद्ध होते. आज काल अन्टीबायोटीकचा उपयोग फार होत आहे, त्यामुळे ही जैविक संपदा नष्ट होत असते त्यासाठी अशा प्रसंगी पंचामृताचे सेवन विशेष महत्वाचे ठरते. अशा बर्याच तरतुदी धर्माच्या पवित्र नियमांत केल्या जातात कारण, त्या धर्मात करण्याचे सांगितले किं, त्यांचे पालन इमाने इतबारे होत असते. एरवी माणसे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. ह्यासाठी धर्मातील विविध तरतुदीं मागील उद्देश समजून काम करणे चांगले असते. अनेक पुजाविधीत पंचामृताचे चाटण करण्याचे सांगितले आहे ते कां, ते समजू शकतो. दूध, दही, मध, तूप व साखर हे पांच घटक समप्रमाणात मिळून पंचामृत बनवले जाते. पंचारिष्ट बाजारत तयार मिळते ते घ्यावे. अशारितीने विज्ञानाने समृद्ध असा हिंदू विचार आम्हाला अभिप्रेत आहे.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू – १५१ -१६०
कर्जावरील व्याज (पैशाने) एकावेळी भरल्यास तें मुद्दलाच्या दुप्पट असणार नाही. परंतु, धान्य, फळं, लोकर, केस, जनावरे ह्यांच्या स्वरुपात भरल्यास ते पांचपटीपेक्षा जास्त नसेल. १५१
नियमांने आखून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व्याज आकारल्यास त्या व्याजाला लुटमार अथवा चोरी व्याज असें समजले जाईल. तसें व्याज वसुल करतां येणार नाही. १५२
एक वर्षापेक्षा जास्त काळांचे व्याज एका वेळी घेता येणार नाही. अवैध पद्धतीने कर्जे जसें चक्रवाढ व्याज, मर्यादित काळाची, ठरलेल्या व्याजाची आणि शरीर श्रमाने वसुल करण्याची अशी कर्जे देणे गुन्हा आहे. १५३
जर ऋणको व्याज देण्यास समर्थ नाही असें सिद्ध झाले तर त्याला नवीन करार करून ते कर्ज पुढे चालवता येईल. १५४
जर तसें देणे त्याला शक्य नसेल तर ते व्याज नवीन करारात मुद्दलात समाविष्ट करून घेता येईल. परंतु, ते व्याज त्याला द्यावेच लागेल. १५५
चाकाच्या वाहनानें सामान विशिष्ठ ठिकाणी ठरलेल्या वेळात पोहोचावण्याचा करार केला व त्या ठिकाणी व त्या वेळांत तो ते सामान पोहोचवू शकला नाही तर त्याला ठरलेले पैसे मागता येणार नाहीत. १५६
पाण्यातून वाहतूक करणार्यासा कोठे, किती वेळात काय प्रकारचे सामान न्यावयाचे व त्यासाठी किती पैसे घ्यावयाचे ते चांगलेच माहीत असते त्याप्रमाणे, तो तसा आकार घेऊ शकतो. ते वैध ठरते. १५७
ऋणकोसाठी जो हमी रहातो त्याला जर ऋणकोने ते फेडले नाही तर ऋणकोचे कर्ज फेडावे लागेल. १५८
हमीदाराकडून हमी पूर्ण झाली नाही अथवा तोंच दिवाळीखोर ठरला पण तो जीवंत आहे असें तर त्याचे कर्ज व इतर भरपाई त्यांचा मुलगा देण्यास बांधलेला नाही. १५९
परंतु, जर हमीदार मेला तर मात्र त्या सर्व बाकीची भरपाई मुलाकडून वसुल करावयाची कां नाही ते न्यायाधीश ठरवेल त्या प्रमाणे होईल. १६०

क्रमशः पुढे चालू -
मनुस्मृती आठवा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा